करंजा येथील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे न्यायाची मागणी
परंडा | माझं गांव माझं शहर | प्रतिनिधी (दि. २८ मे) सप्टेंबर २०२५ मध्ये सीना नदीला आलेल्या महापुरामुळे करंजा येथील मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी खरडून गेल्या होत्या. मात्र नुकसान भरपाईच्या पंचनाम्यात तलाठी व कृषी सहाय्यक यांनी बोगस लाभार्थ्यांचा समावेश करून प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा गंभीर आरोप करत करंजा येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे सखोल चौकशीची…
