अवकाळी पावसाचा कहर : सिरसाव परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, तातडीच्या मदतीची मागणी
माझं गाव माझं शहर | परंडा तालुक्यातील सिरसाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पपई, पेरू, मका, केळी, आंबा तसेच इतर फळबागा आणि उभी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी…
