दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक योजना : २०० विद्यार्थ्यांना किसान विकास पत्राचे वाटप
धाराशिव (प्रतिनिधी) दि.८ जानेवारी : समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीतून वैयक्तिक व सामूहिक योजना राबविण्यात येतात.वैयक्तिक योजनेअंतर्गत सन २०२५–२६ या आर्थिक वर्षामध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या व जास्त दिव्यांगत्व असणाऱ्या प्रथम २०० विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी २० हजार रुपये प्रमाणे किसान विकास पत्र देण्याची योजना राबविण्यात…