धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्यासाठी फोटोची सक्ती नाही – जिल्हाधिकारी
धाराशिव,दि. २५(माझं गांव माझं शहर) धाराशिव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून, शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी फोटो देण्याची कोणतीही सक्ती नाही, असे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आज स्पष्ट केले. जिल्ह्यात सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पिकांचे…