धाराशिव येथील शेतकरी आंदोलन चिघळले; जिल्हाधिकारी कार्यालया समोरील आंदोलक उपोषणावर ठाम
धाराशिव: येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन अधिकच चिघळले आहे. आंदोलक आणि प्रशासन यांच्यातील कोंडी फुटण्याची चिन्हे दिसत नसून, आज जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आंदोलक अमोल जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, या भूमिकेवर…