दोन दिवसांत महाराष्ट्रात चार पत्रकारांवर भ्याड हल्ले; ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम – “कारवाई नाही तर रस्त्यावर आंदोलन!”भाजप सरकार आल्यापासून पत्रकारांवरचे हल्ले वाढले – संदीप काळे
मुंबई(प्रतिनिधी) महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या केवळ दोन दिवसांत चार पत्रकारांवर झालेल्या भ्याड, अमानुष आणि लोकशाहीविरोधी हल्ल्यांनी पत्रकारिता हादरून गेली आहे. कर्जत, नेवासा, अकोला आणि बदलापूर येथे घडलेल्या या सलग घटनांमुळे राज्यातील पत्रकार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कर्जत तालुक्यातील निष्पक्ष पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला….