प्रशासकीय राजवटीनंतर धाराशिव नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले; अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित!

धाराशिव:(प्रतिनिधी) गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, राज्य निवडणूक आयोगाने अध्यक्षपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर केली आहे. यामध्ये धाराशिव नगरपालिकेचे अध्यक्षपद ‘इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. या घोषणेमुळे तब्बल तीन वर्षांपासून थांबलेल्या राजकीय…

अधिक बातमी वाचा...

रा गे शिंदे महाविद्यालयातील संशोधक विद्यार्थी श्रीपाद आतकरे यांची राज्यस्तरीय आविष्कार २०२५ स्पर्धेसाठी निवड.

परंडा दि:६ (माझं गांव माझं शहर) येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा जिल्हा धाराशिव या महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयांमधील संशोधक विद्यार्थी श्रीपाद शहाजी आतकरे यांची राज्यस्तरीय अविष्कार 2025 या स्पर्धेसाठी निवड झाली. त्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. इंजीनियरिंग व्हरसाटाईल…

अधिक बातमी वाचा...

आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मिडिया’चे राज्य अधिवेशन पंढरपूरमध्ये होणार.

पंढरपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्रातून सुरू झालेली आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ आज ५६ देशांपर्यंत पोहोचली असून तब्बल ६ लाख ७० हजार पत्रकार या संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारांसाठी जगभरात निर्माण झालेली ही केवळ एक सामाजिक चळवळ नसून, पत्रकारांना सक्षम करण्यासाठीचे मोठे व्यासपीठ ठरले आहे. पत्रकारांचे निवास, आरोग्य, संरक्षण यांसारखे मूलभूत…

अधिक बातमी वाचा...

“आपली एसटी” ॲपमुळे आता एसटीचा प्रवास होणार सुखकर; दसऱ्याच्या मुहूर्तावर लोकार्पण

मुंबई, दि. ३ ऑक्टोबर: राज्यभरातील लाखो एसटी प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना गाडी नेमकी कुठे आहे, हे सहजपणे समजणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सोयीसाठी तयार केलेल्या “आपली एसटी” या नवीन मोबाईल ॲप्लिकेशनचे दसऱ्याच्या मुहूर्तावर लोकार्पण होत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव येथील शेतकरी आंदोलन चिघळले; जिल्हाधिकारी कार्यालया समोरील आंदोलक उपोषणावर ठाम

धाराशिव: येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन अधिकच चिघळले आहे. आंदोलक आणि प्रशासन यांच्यातील कोंडी फुटण्याची चिन्हे दिसत नसून, आज जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आंदोलक अमोल जाधव यांची भेट घेऊन चर्चा केली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, या भूमिकेवर…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्यासाठी फोटोची सक्ती नाही – जिल्हाधिकारी

धाराशिव,दि. २५(माझं गांव माझं शहर) धाराशिव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून, शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी फोटो देण्याची कोणतीही सक्ती नाही, असे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आज स्पष्ट केले. जिल्ह्यात सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पिकांचे…

अधिक बातमी वाचा...

सुयश विद्यालया विरुद्ध फिर्याद ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

बार्शी( प्रतिनिधी) : दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर यांनी काढलेल्या आदेशान्वये अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली होती. मात्र या आदेशाचे उल्लंघन करत बार्शी येथील सुयश विद्यालय हे शाळा सुरु ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. याबाबत प्रभारी गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती…

अधिक बातमी वाचा...

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पत्रकार बांधवांना दिलासा

मुंबई (प्रतिनिधी) पत्रकार कल्याण निधी वाढीसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचा तीन वर्षांचा संघर्ष अखेर यशस्वी ठरला आहे. आज महाराष्ट्र शासनाने “शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” अंतर्गत २० कोटी रुपयांच्या पुरवणी अनुदानास प्रशासकीय मान्यता दिली असून त्यामुळे या निधीची एकूण ठेव १०० कोटींवरून १२० कोटी रुपयांवर पोहोचली आहे . या निर्णयामुळे आकस्मिक मृत्यू, अपघात किंवा…

अधिक बातमी वाचा...

परंडा-कारंजा येथील पूरपरिस्थितीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी; बोटीतून केला पाहणी दौरा.

परंडा(तानाजी घोडके ) परंडा तालुक्यातील कारंजा आणि आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर पूरपरिस्थितीची पाहणी आज दि.२४ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) बोटीमधून प्रवास करत त्यांनी पूरग्रस्त भागाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक, परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार डॉ. तानाजीराव सावंत आणि जिल्हाधिकारी कीर्ती किरण…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव येथे रविवारी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात दिव्यांग-शेतकरी हक्क मेळावा

प्रतिनिधी (धाराशिव)राज्यातील दिव्यांग बांधव, शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उठवणारे प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली सध्या राज्यभरात हक्क यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या अनुषंगाने दिव्यांग मार्गदर्शन मेळावा व शेतकरी हक्क मेळावा येत्या रविवार, 28 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नगरपालिका धाराशिव येथे आयोजित करण्यात…

अधिक बातमी वाचा...

पत्रकारांवरील हल्ल्याचा व्हॉईस ऑफ मीडिया कडून निषेध.

मुंबई(माझं गांव माझं शहर) त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने या तिघा पत्रकारांवर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर काम करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी एकामागोमाग एक दगड, लाथा-बुक्क्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी झाले असून…

अधिक बातमी वाचा...

‘चाकोरीबाहेरील मैत्रीणी’ कर्तृत्ववान महिलांचा कृतज्ञता सोहळा पनवेलमध्ये भव्य सोहळा.

नवी मुंबई (प्रतिनिधी) सामान्यतेच्या चाकोरी मोडून अपार जिद्दीने स्वतःचा प्रवास घडवणाऱ्या महिलांचा गौरव करणे हे केवळ स्त्रीशक्तीचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून ‘मनमुक्त फाऊंडेशन’ तर्फे येत्या शनिवार, २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता सुरुची हॉल, पनवेल येथे ‘चाकोरीबाहेरील मैत्रीणी, कृतज्ञता सोहळा’ हा ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित केला जात आहे.महाराष्ट्रातील…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!