धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या, माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांची मागणी.
तुळजापूर(माझं गांव माझं शहर) : धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शासनाने निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी ५०,००० रुपयांची आर्थिक मदत तात्काळ जाहीर करावी, अशी जोरदार मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे. मंगळवार, दि. १९ ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.जिल्ह्यात झालेल्या…