परंडा (तानाजी घोडके) परंडा तालुक्यातील देऊळगाव खैरी नदीवर असलेला कोल्हापुरी बंधाऱ्याजवळील पूल सध्या जीवघेणा ठरत असून, या मार्गावरील रहदारीमुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः या पुलावरून शाळा असल्यामुळे लहानग्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
देऊळगाव – डोंजा या वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या या पुलावरील संरक्षित लोखंडी कठाडे ( रेलिंग) पूर्णपणे वाहून गेले आहेत. यामुळे रात्री- अपरात्री किंवा पावसाळ्यात वाहन चालवताना दुचाकी आणि चारचाकी काम सुरू आहे, परंतु हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
एका बाजूला मुख्य रस्त्याचे काम सुरू असताना, दुसऱ्या बाजूला अत्यावश्यक असलेल्या पुलाच्या दुरुस्तीकडे संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधून देऊळगाव ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ पुलाची दुरुस्ती करून सुरक्षितता पुरवावी, अशी आग्रही वाहनांचे मोठे अपघात होण्याची पुलावरून होणारा वावर चिंतेचा विषय मागणी केली आहे. निष्काळजीपणामुळे शक्यता वाढली आहे.
पुलाच्या लगतच शाळा असल्याने शाळा सुटताना आणि भरताना विद्यार्थ्यांचा या धोकादायक ठरला आहे. या मार्गावर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून देऊळगाव – डोंजा रस्त्याचे भविष्यात कोणताही मोठा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.