सोयाबीन हमीभाव केंद्रे तात्काळ सुरू करा, ‘भावांतर योजना’ लागू करा; आमदार कैलास पाटील यांची पणन मंत्र्यांकडे मागणी

धाराशिव:(प्रतिनिधी) राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर मजुरी आणि सणाच्या खर्चासाठी पैशांची गरज असल्याने, शेतकरी कवडीमोल भावाने सोयाबीन विकण्यास भाग पडत आहे. सोयाबीनचा हमीभाव ५,३२८ रुपये असताना व्यापाऱ्यांकडून केवळ ३,००० ते ३,५०० रुपयांनी खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यात सोयाबीन हमीभाव खरेदी…

अधिक बातमी वाचा...

भाजपा मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांची SSC/HSC परिक्षा शुल्क माफ करण्याची विनंती.

परंडा(तानाजी घोडके) धाराशिव जिल्ह्यासह मराठवाडा तसेच राज्यातील काही जिल्ह्यात गेले काही दिवस सतत ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अतिवृष्टी होऊन नद्या, नाले, ओढ्यांना महापूर येवून सर्वच शेतीपिकांचे, फळबागांचे व पशुधनांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरयांचा हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावला गेला आहे. तसेच महापूराने नदी, नाले व ओढ्या काठच्या जमिनी खरडून जाऊन अतोनात…

अधिक बातमी वाचा...

रक्षा विसर्जन करून नाही तर वृक्ष रोपनातून जपणार आईच्या स्मृती .

कंडारी (प्रतिनिधी) -दि ६ आपल्या घरातील गेलेल्या व्यक्तिच्या रक्षा व अस्थि तिर्थक्षेत्री किंवा नदीत विसर्जन न करता त्या व्यक्तीने आयुष्यभर कष्ट केलेल्या शेतात टाकून त्यावर वृक्षारोपण करणे म्हणजे त्या व्यक्तीबरोबर निसर्गाप्रती देखील कृतज्ञता व्यक्त करणे होय. हा आदर्श मोरे परिवाराने जपला आहे. परंडा तालुक्यातील कंडारी येथील साळूबाई रघुनाथ मोरे यांचे दि ४ रोजी अल्पशा आजाराने…

अधिक बातमी वाचा...

डॉ.प्रतापसिंह पाटील (भैय्या ) यांच्याकडून जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मुलींना वह्या वाटप.

परंडा(प्रतिनिधी)परंडा येथील जिल्हा परिषद शाळा व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याची गरज भासते आणि ती ओळखून सामाजिक युवा नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्याकडून 60 विद्यार्थिनी यांना प्रत्येकी अर्धा डझन वह्या वाटप करण्यात आले. समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण घेणे सुलभ व्हावे त्यांना शिक्षण कार्यात हातभार लागावा या उद्देशाने त्यांनी जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!