विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; संतप्त ग्रामस्थांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी.
परंडा (तानाजी घोडके) परंडा तालुक्यातील देऊळगाव खैरी नदीवर असलेला कोल्हापुरी बंधाऱ्याजवळील पूल सध्या जीवघेणा ठरत असून, या मार्गावरील रहदारीमुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः या पुलावरून शाळा असल्यामुळे लहानग्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. देऊळगाव – डोंजा या वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या या पुलावरील संरक्षित लोखंडी कठाडे ( रेलिंग) पूर्णपणे वाहून गेले…