परंडा, भूम तालुक्यात महापुराचा कहर: NDRF आणि लष्कराच्या जवानांनी ३०० नागरिकांना दिले जीवदान.
परंडा (तानाजी घोडके )परंडा आणि भूम तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने हाहाकार माजवला असून, शेकडो नागरिकांचे जीवन धोक्यात आले होते. मात्र, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), भारतीय लष्कर आणि जिल्हा प्रशासनाच्या जवानांनी गेल्या दोन दिवसांत आपले प्राण धोक्यात घालून दिवस-रात्र बचावकार्य राबवले. या धाडसी मोहिमेत पाण्याच्या कचाट्यात अडकलेल्या ३०० नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले…