myvillagemycitynews

ग्रामीण भागातील , दिव्यांग व्यक्तीच्या हक्काचे आपले ई पेपर पोर्टल

BARSHI MURUD

मुरूमजवळील तुगाव फाट्यावरील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर छापा; दोन बांगलादेशी तरुणी ताब्यात, तिघांवर गुन्हा

मुरूम (प्रतिनिधी )मुरूम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुगाव फाट्याजवळील एका धाब्यावर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर धाराशिव येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने (AHTU) धडक कारवाई केली. सोमवारी (दि. २७) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत देहविक्री करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर अड्डा चालवणाऱ्या तीन युवकांना अटक करण्यात आली आहे….

अधिक बातमी वाचा...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिंती रंगल्या गोव्या-माव्याच्या पिचकार्‍याने; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

      परंडा (तानाजी घोडके) तालुक्यातील दळणवळणाच्या रस्ता , सडक ग्रामीण भागातील रस्ते निगराणी करणारे कार्यालय म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग या बांधकाम विभागातील कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भिंती खिडक्या ऑफिस कोपरे गोवा, मावा, पान पिचकार्याने रंगलेल्या पहावयास मिळाल्या . दर्शनी भागामध्ये खिडक्यांच्या कोपऱ्यामध्ये हे दृश्य सार्वजनिक बांधकाम विभागातील आहे.    याकडे वरिष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून…

अधिक बातमी वाचा...

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; संतप्त ग्रामस्थांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी.

परंडा (तानाजी घोडके) परंडा तालुक्यातील देऊळगाव खैरी नदीवर असलेला कोल्हापुरी बंधाऱ्याजवळील पूल सध्या जीवघेणा ठरत असून, या मार्गावरील रहदारीमुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः या पुलावरून शाळा असल्यामुळे लहानग्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. देऊळगाव – डोंजा या वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या या पुलावरील संरक्षित लोखंडी कठाडे ( रेलिंग) पूर्णपणे वाहून गेले…

अधिक बातमी वाचा...

समाजसेवक अनिल शिंदे, विजय खरात यांच्या विशेष प्रयत्नातुन ५०० पुरग्रस्त व गरजुना मदत.

अनाळा(प्रतिनिधी पुणे पाणीपुरवठा ठेकेदार संघटनेच्या वतीने परंडा तालुक्यातील विवीध पुरग्रस्त गावातील गरजुना 400 अन्नधान्याच्या किटसह शालेय विद्यार्थ्यांना तीन हजार ड्रेससह ५०० तरुनांना टि शर्टचे वाटप करण्यात आले या बाबत सविस्तर माहिती अशी की पुणे येथील पुणे शहर पाणी पुरवठा संघटनेच्या वतीने नंदकुमार जगताप विजय भाऊ अल्हाट व विक्रमजी पाटुळे यांच्या सहकार्याने व समाजसेवक अनिल भाऊ…

अधिक बातमी वाचा...

सुरुवात शाम ने केली, समारोप अमोल ने केला : श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये २५ वर्षानंतर रंगला ६०जणांचा स्नेह मेळावा.

रामेश्वर(प्रतिनिधी)सन 1999-2000 सालच्या दहावी च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. मार्च २००० मध्ये दहावीची परीक्षा दिल्यानंतर सर्वांनी आपापल्या दिशेने मार्गक्रमण केले. त्या प्रवासात अनेकांनी यश, संघर्ष आणि चढउतार अनुभवले; पण आज २५ वर्षांनंतर पुन्हा शाळेच्या प्रांगणात भेटल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो क्षण शब्दात व्यक्त करणे प्रत्येकासाठी अवघड होते. धकाधकीच्या आयुष्यात सर्वजण आपल्या कामात…

अधिक बातमी वाचा...

पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन

पुणे, दि. २४: पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत भारत निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीसाठी ऑफलाईन सुविधेसोबतच ऑनलाईन मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विभागातील जास्तीत जास्त पात्र मतदारांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर ६ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व…

अधिक बातमी वाचा...

जगदाळवाडी येथील गणपती मैदानावर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

परंडा (माझं गाव माझं शहर) देशाचे भवितव्य घडवणा-या युवा पिढी मध्ये एकता,बंधुता, राष्ट्रभक्ती ,सामाजिक एकता व खिलाडूवृत्ती या मूल्यांची जोपासना व्हावी म्हणून दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन ह.भ.प नानासाहेब महाराज व पोलीस पाटील रावसाहेब गिरी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.त्यानंतर जगदाळवाडी ,हिंगणगाव, देऊळगाव ,पारेवाडी,डोंजा काटेवाडी या सीमाभागावर असणाऱ्या गणपती मैदानात जगदाळवाडी येथील…

अधिक बातमी वाचा...

तुळजापूर नगरपालिका निवडणूक: भ्रष्ट व्यवस्थेला हद्दपार करण्याचे ओमराजे निंबाळकरांचे आवाहन.

तुळजापूर (प्रतिनिधी) आगामी काळात येऊ घातलेल्या तुळजापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीने (मविआ) ही निवडणूक एकत्रितपणे लढवण्याची घोषणा केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आज तुळजापूर येथील लोहिया मंगल कार्यालयात यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास…

अधिक बातमी वाचा...
KHASDAR OMRAJE NIMBalkar

दिवाळीपूर्वी अनुदानाचे आश्वासन फोल! खासदार निंबाळकर संतप्त; प्रशासनाला धरले धारेवर

धाराशिव: (तानाजी घोडके) “दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होईल,” या सरकारी घोषणेचा बोजवारा उडाला आहे. दिवाळी संपूनही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ‘फार्मर आयडी’ प्रलंबित असल्याच्या तांत्रिक गोंधळामुळे हजारो शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले आहेत.या गंभीर प्रकारावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी…

अधिक बातमी वाचा...

मदारी समाजातील व शेतमजूर गरीब लोकांना आमदार डॉ प्रा तानाजीराव सावंत यांच्यातर्फे दिवाळी फराळाचे वाटप..

परंडा (प्रतिनिधी)मतदारसंघातील महा भयंकर नैसर्गिक आपत्तीचे संकटातून उद्भवलेली महापूर परस्थीतीने शेतकरी व शेतमजुरांचा संसार कोलमडला, जगण्याची भ्रांत झाली मतदारसंघाचे आमदार डॉ प्रा तानाजीराव सावंत तथा मा.आरोग्य मंत्री तात्काळ मदतीला धावून आले. अत्यावश्यक सर्व मदत प्रशासनाशी समन्वय साधून मायेचा आधार दिला, तशाच दिपावली सारखा महत्त्वाचा सण आला, व शेतकरी, शेतमजूर, दिन दलित, गरीब जनतेच्या प्रेमापोटी दिपावलीचा…

अधिक बातमी वाचा...

पत्रकार गणेश वाघमोडे यांनी केली पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी

परंडा(प्रतिनिधी) पत्रकार गणेश वाघमोडे यांनी यंदाची दिवाळी पूरग्रस्तांसोबत साजरी करण्यात निर्णय घेतला होता. वाघमोडे यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना गृहपयोगी साहित्य आणि फराळ देऊन यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. वाघमोडे यांनी वैयक्तिक स्तरावर हा उपक्रम हाती घेऊन पूरग्रस्त कुटुंबांना प्रभावित केले. धाराशिव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पुरामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. महापुराचा सर्वाधिक फटका परंडा…

अधिक बातमी वाचा...

सोयाबीन हमीभाव केंद्रे तात्काळ सुरू करा, ‘भावांतर योजना’ लागू करा; आमदार कैलास पाटील यांची पणन मंत्र्यांकडे मागणी

धाराशिव:(प्रतिनिधी) राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर मजुरी आणि सणाच्या खर्चासाठी पैशांची गरज असल्याने, शेतकरी कवडीमोल भावाने सोयाबीन विकण्यास भाग पडत आहे. सोयाबीनचा हमीभाव ५,३२८ रुपये असताना व्यापाऱ्यांकडून केवळ ३,००० ते ३,५०० रुपयांनी खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यात सोयाबीन हमीभाव खरेदी…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!