📰 परंडा तालुक्यात संतापजनक घटना : दलित शेतकऱ्याच्या शेतात तोडफोड, ४५ हजारांचे नुकसान; ऑट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल

माझं गांव माझं शहर, दि.२७(प्रतिनिधी) परंडा तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली असून, जातीय द्वेषातून एका दलित शेतकऱ्याच्या शेतीवर हल्ला करून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बावची शिवारातील शेतकरी उमेश भास्कर सोनवणे यांच्या शेतातील पाइपलाइन, बोरवेल व सिंचन साहित्याची तोडफोड करण्यात आली. यामध्ये सुमारे ४५ हजार रुपयांचे…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अर्थसहाय्यात वाढ ; UDID-आधार लिंक व DBT नोंदणी अनिवार्य

धाराशिव,दि.२५ मार्च (माझं गांव माझं शहर) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजना विभागाकडील शासन निर्णय १५ सप्टेंबर २०२५ अन्वये दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणा-या अर्थसहाय्यात १५०० रुपयांवरून २५०० रुपये वाढ करण्यात आलेली असून ही वाढ ऑक्टोबर २०२५ पासून लागू करण्यात आलेली आहे.तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजना विभागाकडील शासन निर्णय २४ फेब्रुवारी २०२६ अन्वये विशेष सहाय्य…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जिल्ह्यात शेतरस्त्यासाठी दिव्यांग शेतकऱ्याचा आमरण उपोषणाचा इशारा

धाराशिव, दि. 23 मार्च 2026 — शेतात जाण्यासाठी आवश्यक रस्ता मिळावा या मागणीसाठी स्थानिक दिव्यांग शेतकरी नारायण हनुमंत साखरे यांनी प्रशासनाला इशारा दिला असून, मागणीची दखल न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनात साखरे यांनी नमूद केले आहे की, त्यांनी 1 डिसेंबर 2025 रोजी तहसील कार्यालय, धाराशिव येथे शेतरस्त्यासाठी अर्ज…

अधिक बातमी वाचा...

जिद्द आणि चिकाटीचा विजय: मोलमजुरी करून आईने मुलांना शिकवलं, मुलगा झाला पोलीस!

परंडा(माझं गांव माझं शहर) परंडा तालुक्यातील कुभेफळ ता.परडा येथील निसार शेख झाला पोलिस “कष्टाला पर्याय नाही आणि जिद्दीपुढे आभाळही ठेंगणं असतं,” याचाच प्रत्यय कुभेफळ ता परंडा येथील एका माऊलीने आणून दिला आहे. पतीच्या निधनानंतर खचून न जाता, अत्यंत बिकट परिस्थितीत मोलमजुरी करून आपल्या तिन्ही मुलांना शिक्षण दिले आणि आज तिचा मुलगा पोलीस दलात भरती होऊन…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी UDID कार्ड अनिवार्य; तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांचे जाहीर आवाहन

धाराशिव : विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आता युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) कार्ड अनिवार्य करण्यात आले असल्याची माहिती तहसील कार्यालय धाराशिवच्या वतीने देण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी जाहीर आवाहन केले आहे.शासनाच्या निर्देशानुसार : संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बक्षीस वितरण

, परंडा(MY VILLAGE MY CITY )बावची विद्यालय, परंडा . या विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर विविध मॉडेल्स व प्रयोग सादर करून आपली वैज्ञानिक दृष्टीकोन व कल्पकता दाखवून दिली. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध प्रयोग स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग उद्योग समूह , महाराष्ट्र राज्य आयोजित ग्रामीण रुग्णालय परांडा येथे दिव्यांग तपासणी शिबिर संपन्न.

परंडा(प्रतिनिधी) तालुक्यातील दिव्यांग व्यक्तीसाठी तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांगाना प्रमाणपत्र मिळावे , दिव्यांगांची होणारी हेळसांड थांबावी, दिव्यांग सेवा तालुक्यात मिळाव्यात या मागणीसाठी दिव्यांग उद्योग समूह या सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून परंडा शहर व तालुक्यातील दिव्यांग तपासणी शिबिर दिव्यांग अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.त्या अनुषंगाने आज दिनांक 6 मार्च 2026 वार शुक्रवार परंडा…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी टूलकिट खरेदीसाठी अर्थसहाय्य योजना.

परंडा(माझं गांव माझं शहर)महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना राबविली आहे. या योजनेंतर्गत दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी टूलकिट खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येत आहे. पूर्वी या योजनेद्वारे केवळ एक हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध होते, परंतु आता ते वाढवून कमाल १५ हजार रुपयांपर्यंत करण्यात आले आहे. या वाढीमुळे दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसाय…

अधिक बातमी वाचा...

‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’मुळे दिव्यांग सक्षमीकरणाला डिजिटल गती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिव्यांगांच्या सेवा वितरण होणार अधिक सुलभ व पारदर्शक मुंबई, दि. २२ : दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावा, यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने हे एकात्मिक ऑनलाइन पोर्टल आणि मोबाईल अॅप विकसित केले आहे.दिव्यांग सहाय्यक पोर्टल’मुळे सेवा वितरणाला डिजिटल गती मिळणार असून दिव्यांगांच्या सेवा वितरण होणार अधिक सुलभ व पारदर्शक होणार असल्याचे मुख्यमंत्री…

अधिक बातमी वाचा...

विशेष सहाय्य योजनेअंतर्गत ♿ दिव्यांग योजना तात्काळ आधार लिंक करा; अन्यथा अनुदान बंद !

महाराष्ट्र(मुबंई) राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सूचनांनुसार विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे यूडीआयडी कार्ड व आधार कार्ड संलग्नीकरण करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले वैश्विक ओळखपत्र (UDID Card), आधार कार्ड तसेच बँक खात्याची छायांकित प्रत तात्काळ संगणकीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करावी. या…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांगाना मिळणार फिरते दुकान ;अनुदानासाठी २५ कोटीची तरतूद..

मुंबई: राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून दिव्यांगाना रोजगारक्षम बनविण्यासाठी त्यांना फिरत्या दुकानांसाठी अनुदान दिले जाते. याअंतर्गत अपंग व्यक्तींना ई वाहन पुरविले जात असून निधीअभावी ही योजना रखडली होती. या योजनेला आता पुन्हा गती देण्यात आली असून यासाठी सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून २५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे अपंग व्यक्तींना रोजगारासाठी ई वाहनावरील फिरते…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक योजना : २०० विद्यार्थ्यांना किसान विकास पत्राचे वाटप

धाराशिव (प्रतिनिधी) दि.८ जानेवारी : समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीतून वैयक्तिक व सामूहिक योजना राबविण्यात येतात.वैयक्तिक योजनेअंतर्गत सन २०२५–२६ या आर्थिक वर्षामध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या व जास्त दिव्यांगत्व असणाऱ्या प्रथम २०० विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी २० हजार रुपये प्रमाणे किसान विकास पत्र देण्याची योजना राबविण्यात…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!